वाढिदवशी आणि मागील वर्षात घडलेल्या मंगल घटनांप्रीत्यर्थ, तसेच कठीण प्रसंगी सद्गुरुंनी दिलेल्या आधाराबद्दल सद्गुरुंप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांची कृपा आयुष्यभर अशीच लाभत रहावी ही प्रार्थना करण्यासाठी श्रद्धावान ‘जन्मदिन सुदीप’ अर्पण करतात.
दुष्प्रारब्धामुळे प्रापंचिक मानवास शारीरिक, मानसिक किंवा अन्य प्रकारच्या पीडा सतावत असतात. या पीडामुळे त्या व्यक्तीचे, तसेच त्याच्या कुटुंबाचे जीवन कष्टय बनते. या पीडांचा नाश व्हावा यासाठी, तसेच पीडानिवारण झाल्यावरही श्रद्धावान ‘पीडानाशक सुदीप’ अर्पण करतात.
जीवनात अनेक प्रकारच्या बाधा आपल्या जीवनास क्लेशमय बनवितात. या बाधांचा आपल्या जीवनातील प्रभाव दूर करण्यासाठी, व असा प्रभाव कमी झाल्यावरही श्रद्धावान ‘बाधानिवारक सुदीप’ अर्पण करतात.